करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सिना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य भैय्या पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. करमाळा तालुक्यात आलेल्या पुरामुळे तरटगाव,बिटरगाव,पोटेगाव, आळजापुर बाळेवाडी खडकी येथील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून यासंबंधी पाहणी दौरा करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळा तालुक्यातील या गावांना बांधावर भेटी देण्यास आले होते यावेळी अजिंक्य पाटील यांनी यासंबंधी तसेच विविध मागणींचे निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये तरडगाव बिटरगाव रस्ता खराब झाल्याने त्वरित दुरुस्त करावा पुरामुळे शेतकऱ्याचे पिकाच्या नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी तरटगाव संगोबा को.प.बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात यावे तरटगाव बंधाऱ्यातून नवेदार टाकल्यावर आळजापूर बिटरगाव शेतामध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान होते व संपूर्ण पाणी मिळत नाही त्यामुळे याकरिता मागच्या बाजूस भिंत बांधण्यात यावी पोटेगाव बंधारा दुरुस्त करण्यात यावा मंगी तलावातील पाणी सोडण्यासाठी बिटरगाव येथील साईपणचे काम सुरू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारून तात्काळ याची दखल घेऊन कार्यवाही करतो असे आश्वासन दिले होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा चिवटे भाजपा नेते कन्हैयालाल देवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सुजित तात्या बागल राष्ट्रवादी उपाध्यक्ष अशपाक जमादार खडकीचे दादा जाधव अशोक मुरूमकर जातेगाव चे युवा नेते तुषार शिंदे पत्रकार जयंत दळवी आदी जण उपस्थित होते