संभाजी ब्रिगेड च्या वतीने करमाळा तालुक्यातील पावसामूळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्यांचे त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी याचे निवेदन नायब तहसीलदार लोकरे साहेब यांना देण्यात आले.करमाळा तालुक्यातील ढगफूटीमुळे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडास आलेला घास पावसाने हिरावून घेतला असून करमाळा तालुक्यातील राहिलेल्या सर्व गावाचे त्वरीत पंचनामे करून व समक्ष शेतकऱ्यांच्या बंधावर जाऊन सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी .अशी संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली .यावेळी सुहास पोळ (तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड करमाळा),नितीन खटके (संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष),बाळासाहेब घाडगे (रयत क्रांति तालुकाध्यक्ष करमाळा) ,अतुल निर्मळ(शहराध्यक्ष जेऊर),गणेश कुकडे (संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक),सोमनाथ जाधव , हेमंत शिंदे , अजित उपाधे , आदिनाथ माने , पांडुरंग घाडगे , अनिल कागदे व शेतकरी उपस्थित होते.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…