सर्व बाबींचा गंभीरतेने विचार करुन महसुल व कृषी विभागाने प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागात जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे तयार करावेत. या नुकसानभरपाई बाबतचा अहवाल तातडीने वरीष्ठ कार्यालयास पाठवावा तरच आगामी काळात पिक नुकसान भरपाईस शेतकरी पात्र ठरतील. शेतकर्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली तरच त्यांचे पुढील पिकाचे उत्पादन घेता येईल. काल १४ सप्टेंबर रोजी रात्रभर करमाळा मतदार संघामध्ये सर्व दूर पाऊस होता. कोर्टीसह अनेक ठिकाणी ढग फुटीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे वाड्या वस्त्या व गावास जोडणारे रस्ते वाहून गेलेले आहेत. सदर रस्ते त्वरित दुरुस्त करावेत. यासोबत महसुल व कृषी विभागाच्या वतीने करमाळा मतदार संघामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यास योग्य ते निर्देश देऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशीही मागणी केली आहे. तर काल झालेल्या ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, घरे, जनावरे, दळणवळण व्यवस्था याबाबत नागरिकांनी थेट महसुल विभागास माहिती द्यावी.तर याबाबत काही अडचणी आल्यास जेऊर येथील आमदार कार्यालयातही नुकसानीचे फोटो अथवा व्हीडिओ पाठवावेत असे आवाहन यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…