शासनाने पाच दिवसांच्या आठवड्यावर पुनर्विचार करून‌ पुर्वीप्रमाणे आठवडा करण्याची धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संजय घोलप यांची मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे मागणी.

करमाळा प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसायांना खीळ बसली आहे. याच्यातून बाहेर निघण्यासाठी सर्वांनाच दुपटीने काम करावे लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या आठवड्यावर ही शासनाने पुनर्विचार करावा व पुन्हा एकदा फक्त रविवार सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करावी अशी मागणी धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहीती अध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे.ग्रामीण भागातून कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आठवड्यातून पाच दिवस काम तर शनिवार, रविवार सुट्टी करण्यासंबंधी शासनाने घेतलेला निर्णय त्यांच्या पद्धतीने बरोबर जरी असला तरी ती परिस्थिती कोरोना महामारी व लॉकडाऊन पूर्वीची होती. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. लोकांच्या हाताला काम नाही. तर उद्योगधंदे व व्यवसाय अधोगतीकडे वळाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात सह शहरी भागातही शनिवार व रविवार सलग सुट्टी असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाशिवाय इतर उद्योग धंद्यावर याचा परिणाम पडताना दिसत आहे .शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, व्यवसाईक किंवा खाजगी कंपनीतही कर्मचारी व सामान्य माणुसच काम करत असतो. विशेष म्हणजे त्यांना सरकारी कर्मचाऱ्यासारख्या सवलती व सुविधाही मिळत नाहीत. तर पाच दिवसाच्या आठवल्यामुळे या सर्वच लोकांवरही ही ताण पडत आहे. कर्ज प्रकरणे लोकांची देणे यासाठी या पाच दिवसांमध्ये काम आटपून शनिवार व रविवार गर्दी कमी तसेच सरकारी कार्यालये बंद असल्याने यांच्याही कामकाजात अडथळा होत आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टीवर फक्त शासकीय कार्यालय बंद न राहता संपूर्ण महाराष्ट्रावर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तरी याबाबत पुनर्विचार करून पुन्हा एकदा रविवार एकमेव सुट्टी करण्यात यावी.अशी मागणी संजय बापु घोलप यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

11 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

11 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

17 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

2 days ago