या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, वाशिंबेचे माजी उपसरपंच अमोल पवार, तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
चौकट :
“आमचे नदीकाठचे क्षेत्र सीना नदीच्या पाण्याने वाहून गेले होते. पालकमंत्री गोरे साहेबांनी रात्री नऊ वाजता आमच्या शेताला भेट दिली होती व त्यांनी तुमचे नुकसान भरून देऊ असा शब्द दिला होता, गेल्या आठ दिवसांपासून बंधाऱ्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे,आता आमच्या शेताच्या कडेला सुमारे १००० मीटर तटबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पुराने शेतीचे नुकसान होणार नाही.”
सौ. मिना भारत माने
महिला शेतकरी, बिटरगाव.
“अगदी कमी वेळेत हे काम सुरू झाल्याने आम्ही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व गणेशभाऊ चिवटे यांचे शतशः आभारी आहोत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व विश्वास निर्माण झाला आहे.”
युवराज गपाट, माजी सरपंच आळजापूर.
“या वर्षी नुकसान झाले असले तरी बंधारा दुरुस्त झाल्याने भविष्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि मेहनतीची उमेद निर्माण झाली आहे.”
डॉ. अभिजित मुरूमकर.
“सीना नदीवरील बंधारे तुटल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई येईल की अशी भीती होती, पण आता दुरुस्तीचे काम झाल्याने आम्ही समाधानी आहोत.”
हरिदास मोरे, शेतकरी तरटगाव.
संपूर्ण घटनेतून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या तत्परतेचा आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…