Categories: करमाळा

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कार्यतत्परता- तरटगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात

करमाळा प्रतिनिधी चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीवरील अनेक बंधारे तुटले, नदीने पात्र बदलले आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी रात्री आठ वाजता प्रत्यक्ष तरटगाव बंधाऱ्याची पाहणी केली होती.या पाहणीनंतर पालकमंत्री यांनी तातडीने जलसंपदा विभागाला बंधाऱ्याच्या फुटलेल्या भरावाचे काम त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून सध्या बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांनी पुढाकार घेत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने त्वरेने प्रतिसाद देत हे काम मार्गी लावले. आज गणेशभाऊ चिवटे यांनी या कामाची पाहणी केली असता ग्रामस्थांनी फोनद्वारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, वाशिंबेचे माजी उपसरपंच अमोल पवार, तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
चौकट :
“आमचे नदीकाठचे क्षेत्र सीना नदीच्या पाण्याने वाहून गेले होते. पालकमंत्री गोरे साहेबांनी रात्री नऊ वाजता आमच्या शेताला भेट दिली होती व त्यांनी तुमचे नुकसान भरून देऊ असा शब्द दिला होता, गेल्या आठ दिवसांपासून बंधाऱ्याचे काम जलद गतीने चालू झाले आहे,आता आमच्या शेताच्या कडेला सुमारे १००० मीटर तटबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात पुराने शेतीचे नुकसान होणार नाही.”
सौ. मिना भारत माने
महिला शेतकरी, बिटरगाव.

“अगदी कमी वेळेत हे काम सुरू झाल्याने आम्ही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व गणेशभाऊ चिवटे यांचे शतशः आभारी आहोत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व विश्वास निर्माण झाला आहे.”
युवराज गपाट, माजी सरपंच आळजापूर.

“या वर्षी नुकसान झाले असले तरी बंधारा दुरुस्त झाल्याने भविष्यासाठी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि मेहनतीची उमेद निर्माण झाली आहे.”
डॉ. अभिजित मुरूमकर.

“सीना नदीवरील बंधारे तुटल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई येईल की अशी भीती होती, पण आता दुरुस्तीचे काम झाल्याने आम्ही समाधानी आहोत.”
हरिदास मोरे, शेतकरी तरटगाव.

संपूर्ण घटनेतून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या तत्परतेचा आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

11 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

15 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

21 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago