कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच वातावरण भक्तिमय होते. विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण नाट्य, संवाद, संगीत व भावपूर्ण अभिनयाच्या माध्यमातून केले. प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान व रावण यांची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयकौशल्य आणि नाट्यनिपुणता दाखवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ, संस्थेच्या पदाधिकारी सौ. सारिका झोळ, सौ. जयमाला बांदल, श्री. धनंजय अडसूळ, श्री. लालासाहेब जगताप, सौ. कौशल्यादेवी जगताप, तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, शाळेच्या संचालिका सौ. नंदा ताटे आणि शाळेच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव.
कार्यक्रमप्रसंगी प्रा. रामदास झोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या तांत्रिक व स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून आध्यात्मिक संस्कारांचीही नितांत गरज आहे. त्यांनी अधोरेखित केले की, रामायण व भगवद्गीता हे अमूल्य धर्मग्रंथ आहेत आणि त्यातील विचार, मूल्ये व जीवनदर्शन विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ‘मॅन्युअल’ प्रमाणे वापरले पाहिजे. सत्य, कर्तव्य, संयम, त्याग व नीतिमूल्ये अंगीकारल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल.
सचिव सौ. माया झोळ व अन्य मान्यवरांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले व असे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करण्यास अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. शाळेच्या संचालिका सौ. नंदा ताटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्या, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
रामायणाच्या माध्यमातून साकारलेला हा संस्कारक्षम कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालक व उपस्थित प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेला. उपस्थितांनी कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…