हा रस्ता गेल्या 50-60 वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. रस्त्याचा वापर गावकऱ्यांकडून मंदिरात जाण्यासाठी तसेच विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी केला जातो. त्यामुळे रस्ता बंद झाल्यास गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर तसेच धार्मिक विधींवर थेट परिणाम होऊ शकतो, असे स्थानिकांनी सांगितले.
आनंद भैय्या झोळ यांनी स्पष्ट केले की, “हा रस्ता फक्त धार्मिक नाही, तर गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिकांचा विचार केला जावा. आपल्या परंपरा आणि गावाच्या हितासाठी आम्ही प्रत्येक प्रकारच्या आंदोलनासाठी सज्ज आहोत.”
सध्या या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि रस्त्याबाबत प्रशासन किंवा कंपनीकडून कोणतेही अधिकृत निर्णय आलेले नाहीत. तज्ज्ञांच्या मते, ग्रामस्थांचा निर्धार प्रशासनावर दबाव निर्माण करतो आणि प्रकल्प अंमलबजावणीपूर्वी स्थानिक समुदायाशी संवाद साधणे आवश्यक ठरेल.
गावकऱ्यांचा हा निर्धार हे दर्शवतो की, परंपरा आणि विकास यांच्यात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने वेळेत योग्य तो न निर्णय घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेतील फार्मसी महाविद्यालयातील डी. फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी शासकीय यंत्रणेमधील वाढता भ्रष्टाचार, हप्ते व टक्केवारीच्या प्रथेमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथे आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय…
करमाळा (प्रतिनिधी) : “जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या उदात्त विचाराने आयुष्यभर गोरगरीब जनतेची निस्वार्थ…