हा रस्ता गेल्या 50-60 वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. रस्त्याचा वापर गावकऱ्यांकडून मंदिरात जाण्यासाठी तसेच विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी केला जातो. त्यामुळे रस्ता बंद झाल्यास गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर तसेच धार्मिक विधींवर थेट परिणाम होऊ शकतो, असे स्थानिकांनी सांगितले.
आनंद भैय्या झोळ यांनी स्पष्ट केले की, “हा रस्ता फक्त धार्मिक नाही, तर गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिकांचा विचार केला जावा. आपल्या परंपरा आणि गावाच्या हितासाठी आम्ही प्रत्येक प्रकारच्या आंदोलनासाठी सज्ज आहोत.”
सध्या या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि रस्त्याबाबत प्रशासन किंवा कंपनीकडून कोणतेही अधिकृत निर्णय आलेले नाहीत. तज्ज्ञांच्या मते, ग्रामस्थांचा निर्धार प्रशासनावर दबाव निर्माण करतो आणि प्रकल्प अंमलबजावणीपूर्वी स्थानिक समुदायाशी संवाद साधणे आवश्यक ठरेल.
गावकऱ्यांचा हा निर्धार हे दर्शवतो की, परंपरा आणि विकास यांच्यात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने वेळेत योग्य तो न निर्णय घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…