यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना करमाळा तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तालुक्यात विविध विकासकामे प्रत्यक्षात दिसून येत असून नागरिकांमध्ये त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील इतर साखर कारखाने सुरू असताना आदिनाथ व मकाई हे सहकारी साखर कारखाने बंद असल्याने शेतकरी सभासद व कामगार अडचणीत आले आहेत. या गंभीर विषयावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असून, जनतेला आता केवळ आरोपांपेक्षा प्रत्यक्ष निकाल अपेक्षित आहेत.
करमाळा तालुक्यातील राजकारणात अलीकडील नगरपरिषद निवडणूक महत्त्वाची ठरली असून, विविध गटांच्या नव्या समीकरणांमुळे भविष्यातील राजकीय दिशा बदलताना दिसत आहे. सावंत गटाची नगरपरिषदेत झालेली एण्ट्री ही तालुक्यातील राजकारणात नव्या नेतृत्वाची सुरुवात असल्याचेही चित्र आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व संजयमामा शिंदे गट सज्ज असून, अनेक नवीन कार्यकर्ते व नेते पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती ॲड. विघ्ने यांनी दिली. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरून विकासाचा ठोस आराखडा मांडण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…