Categories: करमाळा

समाजातील जागृतीसाठी पत्रकारांनी लेखणीचा उपयोग करावा – सुनील बापू सावंत करमाळ्यात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न

*
करमाळा प्रतिनिधी – पत्रकारांनी समाजातील जागृतीसाठी लेखणीचा उपयोग करून समाज कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहावे, तसेच पत्रकारांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सावंत गट सदैव कार्यरत राहून त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त करमाळा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा सावंत गट व करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, या. पंचायत समिती सदस्य आदिनाथचे संचालक ॲड. राहुल सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला.
यावेळी बोलताना सुनील बापू सावंत म्हणाले की, पत्रकार हा समाज घडवणारा महत्त्वाचा घटक आहे. सावंत गटाच्या यशामध्ये पत्रकार बंधूंचा मोठा वाटा असून त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे विकासकामे जनतेपर्यंत पोहोचू शकली. त्यांनी पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याचा मानस यावेळी जाहीर केला.
करमाळा शहर व तालुक्याच्या विकासासाठी युवक आणि पत्रकारांनी दिलेल्या सूचना सकारात्मक दृष्टीने स्वीकारून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम केले जाईल, अशीही त्यांनी घोषणा केली. आगामी काळात सुरू असलेल्या विकासकामांचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करून जनतेसमोर मांडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास नगरसेवक प्रतिनिधी सुनील लुणिया, अमोल परदेशी, हुमरान मुलाणी, नगरसेवक रवी जाधव दादासाहेब इंदलकर संदीप कांबळे पप्पू ओहोळ यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ॲड. बाबुराव हिरडे, नासीर कबीर, विवेक येवले, आशपाक सय्यद, दिनेश मडके, जयंत दळवी, सचिन जव्हेरी अशोक मुरूमकर, शितलकुमार मोटे, अलीम शेख, प्रा. राजेश गायकवाड, विशाल घोलप, सुनील भोसले, प्रवीण अवचर, शेखर स्वामी, संजय चौगुले, हर्षवर्धन गाडे,तुषार जाधव, समाधान फडतरे, प्रफुल दामोदरे, विशाल परदेशी, संजय कुलकर्णी, नागेश चेंडगे,आयुब शेख, उमेश पवळ उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार ॲड. बाबुराव हिरडे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, सावंत गटाने नगरपालिका निवडणुकीत मिळवलेले यश हे सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षांचे मातब्बर प्रतिस्पर्धी असतानाही केवळ जनतेच्या विश्वासावर हा विजय मिळवण्यात आला. हा विजय भविष्यातील राजकारणाची नांदी ठरणार असून सावंत गटाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी पाया रचेल. त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी विकासाभिमुख कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, सावंत गटाला गल्ली बोळातला गट म्हणणाऱ्यांना जनतेने आपली जागा दाखवून दिली असून गटाचे यश विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. त्यामुळे करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. तर ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांनी सावंत गटाच्या कार्याचा लेखाजोखा मांडत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी राहून कार्यतत्पर राहिल्यामुळेच जनता गटाच्या पाठीशी आहे आणि करमाळा शहराच्या विकासात गट प्रभावी भूमिका बजावेल.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विनोद महानवर, बापु उबाळे, सागर सामसे, पांडुरंग घोगरे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ॲड. राहुल सावंत यांनी केले, सूत्रसंचलन देवा लोंढे यांनी तर आभार नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

महिला आरक्षण विधेयकास विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांच्या निषेधार्थ करमाळ्यात जनआक्रोश आंदोलन .

  करमाळा. प्रतिनिधी: लोकसभा व विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची २०२९ पासून अंमलबजावणी करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला…

1 day ago

कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या जयंतीनिमित्त एक मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

करमाळा, प्रतिनिधी १ मे २०२६ — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करमाळा येथे…

3 days ago

दहिगावचे पाणी पेटले… २ दिवसांत पाणी सोडा…अन्यथा २९ तारखेला ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा…

4 days ago

बागेश्वर बाबांच्या वक्तव्याविरोधात करमाळ्यात काँग्रेस आक्रमक; बंदी व अटकेची मागणी

करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण…

5 days ago

सुनेत्रा वहिनींनी विधान परिषदेची उमेदवारी संजयमामांना द्यावी : विवेक येवले

करमाळा(प्रतिनिधी) - येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले…

5 days ago