Categories: Uncategorized

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढवणार – दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी 
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरच लढवण्यात येणार असून, विकासकामांच्या जोरावर करमाळा तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार आहे, असे प्रतिपादन भाजप नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले.
करमाळा येथील बागल निवासस्थानी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित विचारविनिमय मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील होते.
बागल म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी कार्यकर्त्यांनी स्वबळावर ठेवावी. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व ताकदीने पार पाडणे आवश्यक आहे. युती करायची की नाही, याबाबतचा निर्णय योग्य वेळी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. मात्र तोपर्यंत संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमास व्यासपीठावर मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, उपनगराध्यक्ष अतुल फंड, भाजप जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मकाईचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, साहेबराव रोकडे भाजप तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ आदिनाथ चे माजी संचालक दत्तात्रय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी विजय रोकडे, शुभम बंडगर, लक्ष्मण केकान, भाऊसाहेब गव्हाणे, गणेश भोरे, यशपाल कांबळे, कल्याण सरडे, रमेश कांबळे, देवकर गुरूजी यांनी आपली मते मांडत पक्षवाढीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेनुसारच करमाळा तालुक्यातील राजकीय वाटचाल सुरू राहील. सर्वसामान्यांचे हित व पक्षवाढीसाठी प्रसंगी माघार घेण्याची तयारी आहे; मात्र चुकीच्या गोष्टींवर कठोर भूमिका घेतली जाईल.तसेच विलासराव घुमरे यांनी करमाळा तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगून, गटतट व मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने विकासकामांच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुभाष पवार सूत्रसंचालन नितीन चोपडे व रणजित शिंदे यांनी केले, तर आभार विजय लावंड यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ एप्रिल रोजी पिंपळवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय…

1 day ago

करमाळ्यात ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल रोजी भव्य नागरी सत्कार श्री स्वामी समर्थ स्मारकाचे लोकार्पण

करमाळा : प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार  श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त…

2 days ago

२५ वर्षांनंतर रेशन कार्ड वाटप मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी; मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन- औदुंबरराजे भोसले

  करमाळा (प्रतिनिधी): सुमारे पंचवीस वर्षांपासून बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करावी,…

2 days ago

साऊथ कोरिया येथील महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अभिजीत मच्छिंद्र जायभाय यांची प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…

2 days ago

पुण्यातील MNC मध्ये अभिजीत जायभाय यांची साऊथ कोरिया प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…

2 days ago