करमाळा प्रतिनिधी कुकडीचे प्रकल्पाचे ओव्हरफ्लोचे पाणी आणि निमगाव-गांगुर्डी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तलावातील पाणी सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणात सोडण्यात यावे अशी मागणी मुबंई येथे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय भैय्या बागल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यांमध्ये माणसाच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.करमाळा तालुक्यातील मांगी तलाव गत सहा वर्षांपासून न भरल्यामुळे अंदाजे २५ गावातील जनावरांच्या व माणसाच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यातील निमगाव गांगुर्डी तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील सिना नदीद्वारे सिना-कोळगाव धरणात सोडल्यास तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावातील जनावरांच्या व माणसाच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊन पाणी टंचाई दूर होईल.
कुकडी ओव्हरप्लोचे पाणी मांगी तलावासोबतच आपल्या तालुक्यातील रावगाव, भोसे, वीट, कुंभेज, कुंभारगाव, हिंगणी, पोंधवडी, पारेवाडी, सावडी, राजूरी या तलावात सोडण्यात यावे अशी ही मागणी निवेदनाव्दारे दिग्विजय भैय्यांनी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांनी यावर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनास त्वरीत सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच कुकडीचे पाणी आणि सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणाला पाणी मिळणार आहे.
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…
करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…