वाशिंबे प्रतिनिधी सुयोग झोळ
कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लोचे पाणी आणि निमगाव-गांगुर्डी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या तलावातील पाणी सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणात व मांगी तलावासोबतच आपल्या तालुक्यातील रावगाव, भोसे, वीट, कुंभेज, कुंभारगाव, हिंगणी, पोंधवडी, पारेवाडी, सावडी, राजूरी या तलावात सोडण्यात यावे अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती,यावर राज्याचे जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी मागणीची दखल घेत प्रशासनास त्वरीत सूचना केल्या . त्यामुळे लवकरच कुकडीचे पाणी सिना नदीव्दारे सिना-कोळगाव धरणाला मिळणार आहे.व त्याच बरोबर तालुक्यातील मांगी तलावा बरोबर ईतर तलावातही पाणी मिळणार आहे,त्यामुळे दिग्विजय बागल यांच्या मागणीला यश मिळाले आहे, परंतु तालुक्यातील काही नेते मंडळी स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असे करमाळा तालुका शिवसेना युवानेते गणेश झोळ यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…