Categories: Uncategorized

महाराष्ट्र राज्याने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सक्षम नेतृत्व गमावले – आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी 
महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक प्रभावी, निर्णयक्षम आणि सक्षम नेतृत्व गमावले आहे, अशी भावना आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाची उणीव केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्राला ती जाणवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार नारायण आबा पाटील म्हणाले, “अजितदादा पवार यांचे पाटील कुटुंबाशी अतिशय आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणतेही काम घेऊन गेल्यास ते तात्काळ मार्ग काढत असत. मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, तेव्हा ‘नारायणराव’ म्हणून प्रेमाने स्वागत करणारे अजितदादा दिलखुलास, रोखठोक आणि स्पष्ट वक्तृत्वाचे व्यक्तिमत्त्व होते.”
त्यांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना पाटील यांनी सांगितले की, अजितदादा हे निर्णय घेण्यात कधीही मागेपुढे पाहत नसत. प्रशासनावर पकड, विकासाकडे पाहण्याची स्पष्ट दृष्टी आणि कामाचा प्रचंड वेग ही त्यांची ओळख होती. त्यामुळेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आपुलकी होती.
“त्यांच्या जाण्याने केवळ आमचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी सहज भरून निघणारी नाही,” असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर जेऊर–करमाळा तालुक्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून, तालुक्याच्या वतीने दुखवटा पाळण्यात आला आहे. तसेच अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि नेतृत्वाला अभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात  आले असल्याचे त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

3 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

9 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

19 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

23 hours ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

1 day ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago