जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याच्या राजकारणात शनिवारी मोठी उलथापालथ झाली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा असून, येत्या दोन दिवसांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत याची अधिकृत घोषणा होणार आहे. या घडामोडीमुळे करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर अक्षरशः भूकंप झाल्याचे चित्र आहे.
या राजकीय हालचालींचे केंद्र ठरले बार्शी. माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पुढाकाराने बार्शीतील लक्ष्मी सोपान मार्केट येथे माजी आमदार जयवंतराव जगताप व रश्मी बागल यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जगताप गटाने भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयानंतर करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप, संजयमामा शिंदे व रश्मी बागल यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपण तटस्थ राहणार असून मतदारांनी योग्य उमेदवाराला मतदान करावे, अशी भूमिका जाहीर केली होती. या अनपेक्षित घोषणेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या संधीचे महत्त्व ओळखून जगताप यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या पुढाकाराने जगताप, शिंदे व बागल गटात समेट घडून आल्याचे सांगितले जाते.
या राजकीय ऐक्यामुळे करमाळा तालुक्याचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलले असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीचे पारडे जड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. जगताप यांच्या निर्णयाचा थेट लाभ युतीच्या उमेदवारांना होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात समविचारी नेत्यांचे समन्वयक म्हणून ओळख असलेले माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संमतीने माजी आमदार संजयमामा शिंदे, रश्मी बागल आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्यात त्यांना यश आले आहे. परिणामी, जिल्ह्याच्या राजकीय राजधानीचे आणि समन्वयाचे केंद्र म्हणून बार्शी नव्याने उदयास येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी हालचाली वेग घेण्याची शक्यता असून, सर्वांचे लक्ष आता अधिकृत घोषणेकडे लागले आहे.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…