यावर्षी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित कथासंग्रह पुरस्कारासाठी पात्र असतील. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, लेखकाचा अल्पपरिचय आणि छायाचित्र पाठवावे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी आपले साहित्य १० मार्च २०२६ पर्यंत पाठवावे.
सोमनाथ टकले यांनी सांगितले की, हा पुरस्कार ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास आणि नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरतो. यापूर्वी हा पुरस्कार भागवत बावळे (२०११), प्रा. डॉ. अर्जुन होटकर (२०१२), . कल्पना दुधाळ (२०१३), पार्थ पोळके (२०१४), सतीश दराडे (२०१५), ऐश्वर्य पाटेकर (२०१६), रावसाहेब कुंवर (२०१७), तुकाराम पाटील (२०१८), दिनकर कुटे (२०१९), जयदीप विघ्ने (२०२०), हरिश्चंद्र पाटील (२०२१), डॉ. कालिदास शिंदे व बाबुराव इंगळे (२०२२), तान्हाजी बो-हाडे (२०२३), प्रकाश सोनाळकर (२०२४) आणि मारोती मानेमोड (२०२५) यांसारख्या मान्यवर साहित्यिकांना प्रदान करण्यात आला आहे.
साहित्यिकांनी आपले साहित्य पुढील पत्त्यावर पाठवावे –
सोमनाथ मधुकर टकले, मु. पो. वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर – ४१३२२३.
मो. ९६९९७६०८०२.
यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ आणि बाबुराव इंगळे उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…