यावर्षी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित कथासंग्रह पुरस्कारासाठी पात्र असतील. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, लेखकाचा अल्पपरिचय आणि छायाचित्र पाठवावे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून साहित्यिकांनी आपले साहित्य १० मार्च २०२६ पर्यंत पाठवावे.
सोमनाथ टकले यांनी सांगितले की, हा पुरस्कार ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास आणि नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यास उपयुक्त ठरतो. यापूर्वी हा पुरस्कार भागवत बावळे (२०११), प्रा. डॉ. अर्जुन होटकर (२०१२), . कल्पना दुधाळ (२०१३), पार्थ पोळके (२०१४), सतीश दराडे (२०१५), ऐश्वर्य पाटेकर (२०१६), रावसाहेब कुंवर (२०१७), तुकाराम पाटील (२०१८), दिनकर कुटे (२०१९), जयदीप विघ्ने (२०२०), हरिश्चंद्र पाटील (२०२१), डॉ. कालिदास शिंदे व बाबुराव इंगळे (२०२२), तान्हाजी बो-हाडे (२०२३), प्रकाश सोनाळकर (२०२४) आणि मारोती मानेमोड (२०२५) यांसारख्या मान्यवर साहित्यिकांना प्रदान करण्यात आला आहे.
साहित्यिकांनी आपले साहित्य पुढील पत्त्यावर पाठवावे –
सोमनाथ मधुकर टकले, मु. पो. वडशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर – ४१३२२३.
मो. ९६९९७६०८०२.
यावेळी दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ आणि बाबुराव इंगळे उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…