डॉ. हृतिक यांनी एमबीबीएसचे शिक्षण अश्विनी मेडिकल कॉलेज येथून यशस्वीरीत्या पूर्ण केले. शैक्षणिक प्रवासात त्यांनी सातत्य, मेहनत आणि शिस्त या त्रिसूत्रीच्या बळावर उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली. वैद्यकीय शिक्षणादरम्यान त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, रुग्णसेवा उपक्रम आणि शैक्षणिक सादरीकरणांमध्ये सक्रिय सहभाग घेत आपली वेगळी छाप पाडली.
नीट पीजी ही देशातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश संपादन करणे हे कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांचे फलित असते. डॉ. हृतिक यांनी या स्पर्धेत उजवे ठरत बालरोग तज्ञ म्हणून पुढील वाटचालीस भक्कम पाया घातला आहे.
त्यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांचे कौतुक करत ग्रामीण भागातील बालआरोग्य सेवेसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
डॉ. हृतिक यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकवर्ग व मार्गदर्शकांना दिले असून भविष्यात ग्रामीण भागातील बालरुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून युवा पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…