यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. मात्र यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यक्रमाची तारीख बदलून १० मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. यावर्षीचा विवाह सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील नागरिकांनी आपल्या वधू- वरांची नावे या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी नोंदवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गेल्या चार वर्षांपासून श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून मागील तीन वर्षांत सुमारे शंभर वधू- वरांचे विवाह यशस्वीरीत्या लावण्यात आल्याची माहिती चिवटे यांनी दिली. यावर्षी अधिकाधिक विवाह पार पाडण्याचा मानस असून प्रत्येक वधू-वरांना सर्व आवश्यक सुख-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
यंदाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नव वधू- वरांची आकर्षक अशी आगळीवेगळी मिरवणूक काढण्यात येणार आहे , वऱ्हाडी मंडळींसाठी दिवसभर स्वतंत्र जेवण व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले.
सर्वांच्या स्मरणात राहील असा भव्य व दिमाखदार विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पदाधिकारी कामाला लागले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* करमाळा प्रतिनिधी: वेगाने बदलणाऱ्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित व आध्यात्मिक…
करमाळा प्रतिनिधी आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची…
" करमाळा प्रतिनिधी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती आणि मोहरम सणाचे औचित्य साधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा…
करमाळा प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था,…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र (Pharmacy) क्षेत्रात उत्तम करिअर घडवता यावे यासाठी…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून…