Categories: करमाळा

महावितरणच्या ३० दिवसांच्या थकबाकीदार कनेक्शन कटाच्या अटीवर मनसेचा तीव्र निषेध; संजय (बापू) घोलप यांची मागणी – ‘ही अट त्वरित रद्द करावी’*

 

करमाळा प्रतिनिधी : –महाराष्ट्र राज्यातील महावितरण (महाभारत) कंपनीकडून नागरिकांची होत असलेल्या पिळवणुकीविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा उघडला आहे. नवीन स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना दिलेल्या आश्वासनांचा भंग करत, केवळ ३० दिवसांच्या थकबाकीवर वीज कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष संजय (बापू) घोलप यांनी पत्रकारांशी बोलताना ही बाब जोरदारपणे उपस्थित केली. नवीन स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना देण्यात आलेल्या आश्वासनाचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, “नवीन सिमकार्ड असलेली स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना सांगण्यात आले होते की, आता वीज बिल वाचनासाठी मीटरजवळ जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे वेळेवर बिल मिळेल, एवढेच सांगण्यात आले. मात्र, बिल थकल्यास केवळ ३० दिवसांत कनेक्शन कापले जाईल, ही अट कधीच ग्राहकांना सांगण्यात आली नव्हती किंवा जाहीरही करण्यात आली नव्हती.”

श्री. घोलप यांनी या नियमाला जाचक आणि अमानवीय ठरवले. सध्याच्या महागाईच्या काळात, सरकारी कर्मचारी असो वा शेतकरी, सर्वसामान्यांची आर्थिक उलाढाल मंद गतीने होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “अशा परिस्थितीत केवळ एका महिन्याच्या थकबाकीवर वीज कनेक्शन तोडणे म्हणजे गोरगरीबांना विजेपासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ही अट इंग्रजांच्या काळातील जाचक कायद्यांप्रमाणे असून, नागरिकांमध्ये याबद्दल तीव्र नाराजी आहे,” असे ते म्हणाले.

मनसे तालुकाध्यक्षांनी यासंदर्भात ठोस भूमिका मांडताना मागणी केली की, “किमान एक आर्थिक वर्ष (मार्च ते मार्च) थकबाकीची मुदत द्यावी. एका महिन्याच्या थकबाकीवर कनेक्शन कट करण्याची ही अन्यायकारक अट त्वरित रद्द करावी.”

याप्रश्नी लवकरच सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसैनिक राज्यभर रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. “सरकार जनतेच्या हितासाठी आहे की महामंडळाच्या ठेकेदारांच्या हितासाठी, हे लोकांना कळायला हवे,” असे टीकात्मक वक्तव्य करत त्यांनी सरकारचा हा निर्णय जनविरोधी असल्याचे म्हटले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 day ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

1 day ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

1 day ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

3 days ago