राजुरी प्रतिनिधी. राजुरी गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राशन, रॉकेल, ग्रामपंचायत मधील सरकारी योजना, ग्रामसभा, सरकारी कार्यालयाकडून दिली जाणारी माहिती. तसेच गावामध्ये रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर, चोरी, दरोडा, आग लागणे, लहान मुल हरवणे, महिलांची छेडछाड, दागिने चोरीला जाणे, दुकान फोडणे, बिबट्याचा हल्ला, विषारी सर्पदंश, पिसाळलेला कुत्रा गावांमध्ये येणे, निधन वार्ता इत्यादी घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचा जास्तीत जास्त वापर करून चोरी दरोडा घटनांवर आपण आळा घालू शकतो.हे अँप ऍक्टिव्ह करून गावांतील प्रत्येकाचे मोबाईल नंबर ऍड करण्यात आले आहे, ज्या वेळी आपत्ती जनक परिस्थिती मध्ये एकाच वेळी 18002703600 या नंबर कॉल केला असता गावातील सर्वांना तसेच करमाळा पोलिस ठाण्याला कॉल जाऊन मदत मिळू शकते, यामुळे अडचणीत असलेल्या वक्तीला मदत मिळणे सोपे जाईल, परंतु या कॉल चा गैरवापर केला असता त्या वक्तीवर पोलीस ठाण्यातुन गुन्हा दाखल होऊ शकतो.तसेच शासकीय योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचवणे आता ग्रामपंचायतीला सोपे जाईल.त्यामुळे ज्यांचे मोबाईल नंबर अजून ऍड केले नाही त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा,हि योजना यशस्वी होण्यासाठी राजुरीचे सुपुत्र इंदापूर चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर साहेब व करमाळा पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुुळे साहेबांनी मार्गदर्शन केले,अशी माहिती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी दिली.
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…
पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…