या प्रकल्पाचे उद्घाटन शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सदर आरओ प्रकल्पामुळे करमाळा शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांना केवळ एक रुपयात एक लिटर पाणी तसेच दहा रुपयांत पूर्ण पाण्याचा जार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाद्वारे गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला होता. तसेच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक कार्यातून प्रतिष्ठानने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या नव्या उपक्रमामुळे करमाळा शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार असून, नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यातही मदत होणार आहे. समाजहितासाठी प्रतिष्ठान करत असलेले कार्य प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच उपक्रमांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…
करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाच्या पाण्याचा स्वतंत्र हिशोब आमदार पाटील यांनी द्यावा…
करमाळा प्रतिनिधी अनेक वर्षांपासून रखडलेल्या जातेगाव व मांगी परिसरातील वीजेच्या कामाचा प्रश्न सुटला असुन…
करमाळा (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडलाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय…
*करमाळा प्रतिनिधी करमाळा तालूका मंगल कार्यालय असोसिएशन च्या अध्यक्ष पदी विलासरावजी घुमरे सर व उपाध्यक्ष…