या प्रकल्पाचे उद्घाटन शहरातील पत्रकार बांधवांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सदर आरओ प्रकल्पामुळे करमाळा शहरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांना केवळ एक रुपयात एक लिटर पाणी तसेच दहा रुपयांत पूर्ण पाण्याचा जार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाद्वारे गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला होता. तसेच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि विविध सामाजिक कार्यातून प्रतिष्ठानने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या नव्या उपक्रमामुळे करमाळा शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार असून, नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यातही मदत होणार आहे. समाजहितासाठी प्रतिष्ठान करत असलेले कार्य प्रेरणादायी असून, भविष्यातही अशाच उपक्रमांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…