याबाबत अधिक सविस्तर बोलताना करमाळा तालुक्यातील वीजेच्या प्रश्नावर तोडगा निघाला पाहिजे यासाठी आपण एक आमसभा व दोन महावितरण कामे आढावा बैठका घेतल्या होत्या. यातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. या बैठकीत उपस्थित केलेल्या जातेगाव मांगी परिसरातील वीजेच्या प्रश्नावर आता आपल्या पाठपुराव्यामुळे मार्ग निघाला आहे. मांगी व जातेगाव येथील ३३/ ११ केव्हीए सबस्टेशनची ५ एम व्ही ए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवले गेले आहेत. जातेगाव येथे ५ एमव्हीए एक तर मांगी येथे दोन ( एकुण १० एमव्हीए) ट्रान्सफॉर्मर वरुन फिडरच्या कामासाठी ५० लक्ष रुपये निधी मिळाला असुन यातील २० किमी अंतराच्या ११ केव्ही उपवाहिनी कामाची सुरुवात लवकर केली जाईल. यामुळे जातेगाव,पोथरे, मांगी, कामोणे, बिटरगाव श्री, आळजापुर, खडकी या गावातील शेतीपंपाच्या वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला जाणार आहे. या भागातील शेतकऱ्यांना अत्यंत गरजेचे असलेले काम आता मार्गी लागले असुन साधारण एक ते दिड महिन्यात हे काम पुर्ण होऊन या गावांना प्रत्यक्ष वीजेचा लाभ मिळणार असल्याने आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.
तर गुरुवारी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते पोथरे ता. करमाळा येथे या कामांचा शुभारंभ होणार असुन शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आदिनाथचे संचालक देवानंद बागल यांनी केले. यावेळी आदिनाथ संचालक डॉ हरीदास केवारे, पोथरे सरपंच अंकुश शिंदे, तानाजी शिंदे (जातेगाव), भाऊसाहेब खरात ( खडकी), प.स.सदस्य स्वप्नील काळे,हरीदास मोरे बिटरगाव श्री, तात्यासाहेब काळे (आळजापुर), पंकज नलावडे (कामोणे) आदि उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…