भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, करमाळा यांच्या वतीने शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना नासीर कबीर म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही,” या त्यांच्या विचारातून शिक्षणाची ताकद स्पष्ट होते. शिक्षणाच्या बळावरच अन्याय, अज्ञान आणि विषमता दूर करून समाजात समता प्रस्थापित करता येते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच, डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून केवळ अभिवादन न करता त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी आदरांजली ठरेल. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, सहसचिव तुषार जाधव, प्रसिद्धी प्रमुख सचिन चव्हाण मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांच्यासह पत्रकार जयंत दळवी, पत्रकार रितेश कटरीया, रमेश आगरवाल आदी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी शासकीय यंत्रणेमधील वाढता भ्रष्टाचार, हप्ते व टक्केवारीच्या प्रथेमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम येथे आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय…
करमाळा (प्रतिनिधी) : “जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या उदात्त विचाराने आयुष्यभर गोरगरीब जनतेची निस्वार्थ…
करमाळा : प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त…