करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा उडाला असून अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. योजना १०० दिवस चालली ११० दिवस चालली अशी पेपरबाजी करण्यामध्ये पाटील गटाचे प्रवक्ते व्यस्त आहेत परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र खूप वेगळी आहे. पांडे, म्हसेवाडी, सौंदे, शेलगाव क, फिसरे, हिसरे ,अर्जुननगर या गावांना उन्हाळी आवर्तनाचे पाणी मिळालेले नाही. या प्रकाराची दखल घेऊन पंचायत समिती सदस्य भरत भाऊ अवताडे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की,गेल्या २ महिन्यांपासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे .या आवर्तनाचे पाणी लाभक्षेत्रातील व माझ्या पंचायत समिती गणातील सौंदे, शेलगाव क ,फिसरे, हिसरे, अर्जुननगर आदी गावांना मिळालेले नाही. याविषयी मी आपल्याबरोबर वारंवार चर्चा केलेली आहे, परंतु अद्यापही या गावांना पाणी मिळालेले नाही.
रब्बी आणि उन्हाळी आवर्तन सलग ३ महिने चालल्याच्या बातम्या आंम्हाला वर्तमानपत्रातून वाचायला मिळत आहेत.असं असताना माझ्या गणातील गावांना मात्र एक थेंबही पाणी मिळालेले नाही. मग नेमके हे पाणी मुरले कुठे ?
सदर गावांना पाणी मिळणार की २९ तारखेला ठिय्या आंदोलन होणार हे आता पहावे लागणार आहे.
करमाळा, प्रतिनिधी १ मे २०२६ — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करमाळा येथे…
करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण…
पंढरपूर प्रतिनिधी : पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले भव्य मोफत आरोग्य…
करमाळा(प्रतिनिधी) - येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले…
करमाळा (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन…
करमाळा (प्रतिनिधी): करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रतापराव नामदेवराव जगताप यांचा वाढदिवस (दि.…