करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात विजेच्या प्रश्नाने रौद्र रूप धारण केले असून, महावितरणच्या (MSEDCL) हलगर्जीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर प्रश्नावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले असून, तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात लो-व्होल्टेज आणि ओव्हर-व्होल्टेजचा मोठा तांत्रिक बिघाड सातत्याने होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी उपसणाऱ्या मोटारी जळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एका मोटारीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला नाहक ४ ते ५ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे हा आर्थिक भार पडत असल्याचे शंभूराजे जगताप यांनी म्हटले आहे.
आठवडा उलटला तरी प्रशासन ढिम्मच!
मागच्या आठवड्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वीज यंत्रणेचे नुकसान झाले हे मान्य असले, तरी सात दिवस उलटूनही दुरुस्तीचे काम पूर्ण न होणे हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निव्वळ निष्काळजीपणा आहे. “नैसर्गिक संकट आले तर आम्ही समजून घेऊ शकतो, पण दुरुस्तीसाठी सात-सात दिवस विलंब लावणे आणि शेतकऱ्यांच्या पिकांना मरणासन्न अवस्थेत सोडणे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असे जगताप यांनी ठणकावून सांगितले आहे.
हजारो एकर पिके धोक्यात
वीज नसल्यामुळे हजारो एकरांवरील ऊस, केळी आणि इतर नगदी पिके वाळून जात आहेत. भर उन्हाळ्यात पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये या विषयी कोणताही ‘सिरियसनेस’ दिसत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
जगताप गटाचा आक्रमक पवित्रा: आंदोलनाचे रणशिंग!
शंभूराजे जगताप यांनी महावितरण प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे की, जर येत्या २४ तासांत तालुक्यातील वीज समस्या मार्गी लागली नाही आणि मेंटेनन्सचे काम युद्धपातळीवर पूर्ण झाले नाही, तर करमाळा तालुक्यातील हजारो शेतकरी महावितरणच्या कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढतील.
या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला महावितरणचे अधिकारीच जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा शंभूराजे जगताप यांनी ‘जगताप गटाच्या’ वतीने दिला आहे. यामुळे आता प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…