राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा करमाळा शहरामध्ये बसला पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष पाहायला मिळत आहे परंतु अद्याप अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही . व अहिल्यादेवींची 300 वी जयंती पूर्ण देशभर अतिशय उत्साहाने साजरी होत असताना करमाळा शहरात अहिल्यादेवींचा पुतळा बसला पाहिजे असा सूर समाज माध्यमातून उमटत होता . त्यामुळे आज सर्व स्तरातील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध व्हावी याची मागणी लावून धरली .यावेळी डॉ श्रीराम परदेशी गणेश चिवटे , संजय सावंत , संतोष वारे , अमरजित साळुंखे ,शंभूराजे फरतडे ,हनुमंत मांढरे , जगदीश अग्रवाल , संजय घोलप ,शहाजी ठोसर , अभिषेक आव्हाड ,सचिन चव्हाण ,सचिन काळे , नरेंद्रसिंह ठाकूर, अशपाक जमादार, वनराज घोलप , मस्तकीम पठाण , दिनेश मुथा , आप्पा कोंढारे यांच्यासह सकल धनगर समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले , तसेच पत्रकारांची संवाद साधला . यावेळी नगराध्यक्ष सावंत , उपनगराध्यक्ष फंड आणि मुख्याधिकारी यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी दिले आहे .
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…