नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभोरे येथे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सरपंच रविंद्र वळेकर यांनी, “जिल्हा परिषद शाळा वाचवणे ही काळाची गरज असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गावकऱ्यांनी शासकीय शाळांना प्राधान्य द्यावे,” असे आवाहन केले. त्यांच्या या निर्णयाचे पालक वर्गातून स्वागत होत असून, ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत निंभोरे व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गुलाबाची फुले आणि खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच रविदादा वळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वळेकर, पंजाब गाडे, प्रविण वळेकर, लालू कळसाईत, भिमराव काळदाते, कुंडलिक काळदाते, गणेश सलगर, अशोक अण्णा जगताप, पांडुरंग दळवे, श्रीराम काळे सर, संतोष जगताप, अक्षय वळेकर, नाथाभाऊ शिंदे, संजय माळी, नंदू जगताप, भालचंद्र गुरव, सोमा गुरव, जहांगीर शेख, नितीन गायकवाड, भोलेनाथ गवळी, शालेय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…