महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी करमाळा नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
नगराध्यक्षा सावंत यांनी नागरिकांना पाणी वापराबाबत काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ अत्यावश्यक कामांसाठी करावा, पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, गाडी धुणे, बागेला अतिरिक्त पाणी देणे तसेच इतर अनावश्यक वापर टाळावा. घरातील गळती असलेले नळ व पाइपलाइन तात्काळ दुरुस्त करावेत. तसेच बेकायदेशीर पाणी उपसा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. आजची बचत म्हणजे उद्याचे सुरक्षित भविष्य आहे,” असे सांगत नगराध्यक्षा सावंत यांनी पाणी बचतीसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
करमाळा शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळेच भविष्यातील पाणीटंचाई टाळणे शक्य होणार असल्याचे सांगत, नगराध्यक्षा सौ. मोहिनी ताई संजय सावंत, उपनगराध्यक्ष मा. अतुल फंड आणि पाणीपुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी यांनी नागरिकांना पाण्याचे योग्य नियोजन करून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची घटती पटसंख्या ही चिंतेची…
करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…
करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…