संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगी तलाव हा करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनवाहिनी ठरला आहे. या तलावाच्या पाण्यावर केवळ मांगी गावच नव्हे, तर परिसरातील सुमारे २२ गावांतील शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधन अवलंबून आहे. तलावाच्या पाण्यामुळे हजारो एकर शेती बागायतीखाली आली असून परिसरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
तलाव उभारणीसाठी पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे त्याग करून योगदान दिले होते. पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या या त्यागाचा विचार न करता तलावातील पाणी अन्य ठिकाणी वळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
“मांगी तलावातील एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही,” असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. या प्रश्नावर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, पुढील आंदोलनाची दिशा देखील याच बैठकीत ठरविण्यात येणार आहे.
हे आंदोलन राजकारणविरहित असून सर्व पक्ष, संघटना, शेतकरी आणि ग्रामस्थांनी गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा : प्रतिनिधी “आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक ऐकण्यात सभासदांना कोणताही रस राहिलेला…
करमाळा, प्रतिनिधी : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) आणि इतर समाज सहाय्य संस्था (नाशिक) केंद्र-करमाळा…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरेसाहेब यांनी करमाळा मतदार…
करमाळा प्रतिनिधी : कुंभेज फाटा - रामवाडी रोड वरती उमरड येथे गतीरोधक टाकावा कोठावळे शॉपिंग…
करमाळा, प्रतिनिधी : भीमा नदीवरील उभारण्यात येत असलेले तीन महत्त्वाचे पूल हे केवळ वाहतुकीचे साधन…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून व जबाबदारीने करावा,…