संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगी तलाव हा करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनवाहिनी ठरला आहे. या तलावाच्या पाण्यावर केवळ मांगी गावच नव्हे, तर परिसरातील सुमारे २२ गावांतील शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधन अवलंबून आहे. तलावाच्या पाण्यामुळे हजारो एकर शेती बागायतीखाली आली असून परिसरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
तलाव उभारणीसाठी पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे त्याग करून योगदान दिले होते. पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या या त्यागाचा विचार न करता तलावातील पाणी अन्य ठिकाणी वळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
“मांगी तलावातील एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही,” असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. या प्रश्नावर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, पुढील आंदोलनाची दिशा देखील याच बैठकीत ठरविण्यात येणार आहे.
हे आंदोलन राजकारणविरहित असून सर्व पक्ष, संघटना, शेतकरी आणि ग्रामस्थांनी गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधीजीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विचार, भावना, मन आणि कृती यांचा समतोल साधणे आवश्यक…
“ करमाळा प्रतिनिधी : इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या बळावर सोलापूर जिल्ह्यातील…
करमाळा, प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत करमाळा येथील कै. आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या परिसरात…
करमाळा, प्रतिनिधी : श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त करमाळा येथे…
* करमाळा प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि मेहनतीची ताकद आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध…
करमाळा प्रतिनिधी : उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांच्याकडे दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करून आंदोलनाचा…