:
याबाबत माहिती देताना श्री. बागल म्हणाले की, जून महिना संपून जुलैचा निम्मा कालावधी उलटूनही करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक मध्यम प्रकल्प, तलाव आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणात सध्या सुमारे ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तसेच उजनीच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील अनेक धरणे जवळपास ७० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यामुळे उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा असताना करमाळा तालुक्याला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे श्री. बागल यांनी नमूद केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुटपुंज्या पावसाच्या भरोशावर खरीप पेरण्या केल्या आहेत. मात्र पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पिकांची उगवण व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे यंदा भीषण दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प व भीमा-सीना जोड कालव्यातून तातडीने पाणी सोडावे. तसेच उजनीकाठावरील शेतकऱ्यांसाठी पूर्वीप्रमाणे आठ तास वीजपुरवठा सुरू करून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे.
शेतकरी आणि नागरिकांमध्ये वाढती चिंता
पावसाअभावी तालुक्यातील विहिरी, कूपनलिका आणि लहान प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…