या निर्णयाअंतर्गत करमाळा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी भाजप युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही शेतरस्त्यांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करीत आहेत. विशेषतः पावसाळ्यात शेतमालाची वाहतूक करणे कठीण बनते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावोगावी शेतरस्ते विकसित करून शेतीमाल वाहतुकीसाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नियुक्तीमुळे शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार असून, प्रलंबित कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होऊन ग्रामीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
दरम्यान, दिग्विजय बागल यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, शेतकरी हिताच्या या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
करमाळा : प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या हजारो वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी कै.…
करमाळा, प्रतिनिधी : आषाढी वारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा प्रशासनाने जय्यत तयारी…
: करमाळा, प्रतिनिधी : करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून…
करमाळा प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर) मॅपिंग अभियानाला गती…
करमाळा प्रतिनिधी भारतीय न्यायव्यवस्थेचे मानबिंदू, न्यायनिष्ठा, विद्वत्ता आणि संविधानिक मूल्यांचे खंदे पुरस्कर्ते, भारताचे आदरणीय माजी…
करमाळा प्रतिनिधी : निंभोरे व परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे…