या निर्णयाअंतर्गत करमाळा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सह-अध्यक्षपदी भाजप युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही शेतरस्त्यांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करीत आहेत. विशेषतः पावसाळ्यात शेतमालाची वाहतूक करणे कठीण बनते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून गावोगावी शेतरस्ते विकसित करून शेतीमाल वाहतुकीसाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
भाजप युवा नेते दिग्विजय बागल यांच्या नियुक्तीमुळे शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होणार असून, प्रलंबित कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होऊन ग्रामीण विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे.
दरम्यान, दिग्विजय बागल यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, शेतकरी हिताच्या या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…