कारगिल भवन हे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करणारे प्रेरणास्थळ आहे. अशा स्मारकाचे नुकसान होणे ही दुर्दैवी बाब असून, या घटनेमुळे नागरिकांसह माजी सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे अक्रुर शिंदे यांनी म्हटले.
या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने निष्पक्ष आणि सखोल तपास करून संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच कारगिल भवन परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, नियमित देखभाल करणे आणि पोलिस गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपाययोजनांमुळे भविष्यात अशा घटना टाळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहीद जवानांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, समाजातील सर्व घटकांनी अशा स्मारकांविषयी आदराची भावना जपावी, असे आवाहन अक्रुर शिंदे, करमाळा तालुका आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने करण्यात आले.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…