करमाळा प्रतिनिधी केंद्र सरकारने ५ जून रोजी जे तीन अध्यादेश काढलेले आहेत ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून ते शेतकरी विरोधी आहेत.हे अध्यादेश ताबडतोब मागे घेण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाने संपुर्ण देशभर आंदोलन सुरु केले आहे,त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुका अध्यक्ष मधुकर मिसाळ-पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार शांताराम किरवे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस बोलताना मिसाळ-पाटील म्हणाले कि,मूठभर उद्योगपतींना फायदा व्हावा म्हणून हे अध्यादेश काढून केंद्र सरकारने बळीराजावर अन्याय केला आहे.जोपर्यंत हे शेतकरीविरोधी अध्यादेश मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळेस भारत मुक्ती मोर्चा चे कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे तालुकाध्यक्ष निरंजन चव्हाण,डेबूजी युथ ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे,भारतीय विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे,महेंद्र जगदाळे,दिपक कांबळे,जितेश कांबळे सर,प्रशांत भोसले,दत्तात्रय गाडे,रितेश कांबळे,राहुल आहेर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…