करमाळा प्रतिनिधी केंद्र सरकारने ५ जून रोजी जे तीन अध्यादेश काढलेले आहेत ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे असून ते शेतकरी विरोधी आहेत.हे अध्यादेश ताबडतोब मागे घेण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाने संपुर्ण देशभर आंदोलन सुरु केले आहे,त्याचाच एक भाग म्हणून करमाळा तालुका अध्यक्ष मधुकर मिसाळ-पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार शांताराम किरवे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस बोलताना मिसाळ-पाटील म्हणाले कि,मूठभर उद्योगपतींना फायदा व्हावा म्हणून हे अध्यादेश काढून केंद्र सरकारने बळीराजावर अन्याय केला आहे.जोपर्यंत हे शेतकरीविरोधी अध्यादेश मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रीय किसान मोर्चा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळेस भारत मुक्ती मोर्चा चे कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे,राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे तालुकाध्यक्ष निरंजन चव्हाण,डेबूजी युथ ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे,भारतीय विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे,महेंद्र जगदाळे,दिपक कांबळे,जितेश कांबळे सर,प्रशांत भोसले,दत्तात्रय गाडे,रितेश कांबळे,राहुल आहेर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…