करमाळा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या घारगाव ग्रामपंचायतीवर नारायण आबा पाटील गटाने किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत बागल गटाचा धुव्वा उडवत सर्व सातच्या सात जागा जिंकून एक ऐतिहासिक विजय मिळवला.
घारगाव ग्रामपंचायत स्थानापासून आजवर कोणत्याही पक्ष किंवा गटाला एक हाती सत्ता मिळाली नव्हती. सुस्थापितांना धक्का देत
ही किमया नारायण आबा पाटील गटाच्या श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेल ने केली आहे.
या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक 1 मधुन सुलोचना पाटील ,अनिता भोसले, कविता होगले वाॅर्ड क्रमांक 2 मधुन आशा देशमुखे, दत्तात्रय मस्तुद, वाॅर्ड क्रमांक 3 मधुन लक्ष्मी सरवदे ,सतिश पवार हे सात उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. मा.आमदार नारायण आबा पाटील यांनी सत्कार करत सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन गावातील विकास करून गट तट न पाहता ग्रामपंचायतीचा कारभार केला जाईल असे प्रचार प्रमुख किरण पाटील यांनी सांगितले.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…