करमाळा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या घारगाव ग्रामपंचायतीवर नारायण आबा पाटील गटाने किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत बागल गटाचा धुव्वा उडवत सर्व सातच्या सात जागा जिंकून एक ऐतिहासिक विजय मिळवला.
घारगाव ग्रामपंचायत स्थानापासून आजवर कोणत्याही पक्ष किंवा गटाला एक हाती सत्ता मिळाली नव्हती. सुस्थापितांना धक्का देत
ही किमया नारायण आबा पाटील गटाच्या श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेल ने केली आहे.
या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक 1 मधुन सुलोचना पाटील ,अनिता भोसले, कविता होगले वाॅर्ड क्रमांक 2 मधुन आशा देशमुखे, दत्तात्रय मस्तुद, वाॅर्ड क्रमांक 3 मधुन लक्ष्मी सरवदे ,सतिश पवार हे सात उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. मा.आमदार नारायण आबा पाटील यांनी सत्कार करत सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन गावातील विकास करून गट तट न पाहता ग्रामपंचायतीचा कारभार केला जाईल असे प्रचार प्रमुख किरण पाटील यांनी सांगितले.
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…