कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी मांगी तलावात सोडावे-दिग्विजय बागल

*करमाळा प्रतिनिधी  कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी प्रत्येक वेळी तालुक्याला कमी प्रमाणात मिळते. या पाण्याचा फायदा त्यामानाने खूप कमी प्रमाणात आपल्याला होतो. त्यामुळे यंदा वरील लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे, लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी मांगी तलावात सोडले तर त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मांगी तलावाची क्षमता मोठी आहे. या तलावामुळे परिसरातील सर्वच गावांना यांचा फायदा होत असतो. कुकडीवरील धरणांची टक्केवारी पाहता वरील सर्वच धरणे सरासरी ऐशी टक्के भरली आहेत. वर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे वरुन येणारे ओव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुका सह मांगी तलावात सोडवण्यात यावे अशी आपली प्रमुख मागणी असल्याचे बागल यांनी सांगितले*

*कुकडी लाभक्षेत्र मध्ये येणाऱ्या सर्व धरणे सरासरी ऐशी टक्के भरली आहेत. उजनी, सिना कोळगाव धरणाची वाटचाल शंभर टक्के कडे आहे. मांगी तलाव अद्याप ३५ टक्क्यांवरच आहे. मांगी तलाव परिसरात जवळपास २१०० हक्टेर ऊस आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत एक आवर्तन सोडून मांगी तलाव भरणे गरजेचे आहे. आपल्याच तालुक्यामध्ये अजून ही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांची पिके आताशी हाताशी येत आहेत. यामुळे पाण्याची आवश्यकता भासणार आहे. गेल्यावेळी चांगला पाऊस होता म्हणून शेतकऱ्यांनी कुकडी कॅनाल परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस लावला आहे. जर ओव्हर फ्लोचे पाणी तालुक्यासह मांगी तलावात आले तर याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. दिग्विजय बागल, चेअरमन, श्री मकाई सहकारी साखर कारखाना*

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

8 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

3 days ago