करमाळा प्रतिनिधी दसऱ्याच्या सणानिमित्त आज राजुरी ग्रामपंचायत कडून अनुसूचित जमातीमधील भिल्ल महादेव कोळी या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले, 15% मागासवर्गीय ग्रामनिधीतून या वस्तूंचे वाटप करण्यात आले,एकूण 18 कुटुंबाना याचा लाभ मिळाला.यातील बरीचशी कुटुंब ऊस तोडी निमित्त दसऱ्यानंतर परगावी जातात त्यामुळे या संसार उपयोगी साहित्याचा उपयोग त्यांना होणार आहे. राजुरीमधील अनुसूचित जमाती या भूमिहीन आहेत, त्यामुळे शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे, तसेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा यामागचा हेतू आहे असे म्हणणे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी मांडले. यावेळी ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, उपसरपंच धनंजय जाधव, बंडू शिंदे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य कैलास साखरे, भानुदास साखरे ,राजेंद्र भोसले,बंडू टापरे,कल्याण दुरंदे, परसूराम मोरे उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…