राजुरी प्रतिनिधी राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने चार दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत आठवडी बाजार सुरु करण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला. त्यामुळे *सोमवार दिनांक: 25/10/2021 दुपारी 3:00 वाजता* आठवडी बाजार सुरू करण्यात येईल, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजुरी व पंचक्रोशीतील लोकांनी आवश्य उपस्थित रहावे. अशी विनंती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली . ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते, विशेषतः आठवडे बाजारामुळे दर आठवड्याला हजारो,लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते. तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात काही प्रमाणात रोजच भाजीपाला मंडई भरते.
. आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे – छोटे व्यावसायिक आपली दुकाने घेऊन येतात भाजीपाला, फळे, कापड,धान्य, चप्पल, कटलरीसाहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी विक्री होऊन सर्वांची सोय होते. छोट्या व्यवसायीकानाही दोन पैसे पदरात पडतात परंतु,गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ग्रामीण भागातील भरणारे आठवडा बाजार बंद होते . सध्या कोरोनाची रुग्णसंख्या प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घटत आहे. तरीसुद्धा शासकीय नियमानुसार ग्राहक व विक्रेते यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून बाजार येताना योग्य ती काळजी घ्यावी.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…