राजुरी प्रतिनिधी राजुरी ग्रामपंचायतीच्या वतीने चार दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत आठवडी बाजार सुरु करण्यासाठी महत्त्वाचा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला. त्यामुळे *सोमवार दिनांक: 25/10/2021 दुपारी 3:00 वाजता* आठवडी बाजार सुरू करण्यात येईल, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राजुरी व पंचक्रोशीतील लोकांनी आवश्य उपस्थित रहावे. अशी विनंती सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली . ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते, विशेषतः आठवडे बाजारामुळे दर आठवड्याला हजारो,लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते. तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात काही प्रमाणात रोजच भाजीपाला मंडई भरते.
. आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे – छोटे व्यावसायिक आपली दुकाने घेऊन येतात भाजीपाला, फळे, कापड,धान्य, चप्पल, कटलरीसाहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी विक्री होऊन सर्वांची सोय होते. छोट्या व्यवसायीकानाही दोन पैसे पदरात पडतात परंतु,गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ग्रामीण भागातील भरणारे आठवडा बाजार बंद होते . सध्या कोरोनाची रुग्णसंख्या प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घटत आहे. तरीसुद्धा शासकीय नियमानुसार ग्राहक व विक्रेते यांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून बाजार येताना योग्य ती काळजी घ्यावी.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…