करमाळा मतदार संघातील शेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांना यश

करमाळा प्रतिनिधी                                      करमाळा मतदार संघातील शेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांना यश आले असून जिल्हा नियोजन मंडळाच्या आजच्या बैठकीत मा आ पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर मांडला.यावर चर्चा होऊन तात्काळ महावितरणचे सोलापुर जिल्हा अधिक्षक अभियंता यांना करमाळा मतदार संघातील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याचे सुचीत करण्यात आले. यानंतर अधिक्षक अभियंता यांनी याबाबतचे आदेश करमाळा मतदार संघातील विभागीय कार्यालयांना काढण्याची हमी पालकमंत्री भरणे मामा यांच्या समोर मा आ नारायण पाटील यांना दिली. यावर मग माजी आमदार नारायण पाटील यांनी बुधवारी करमाळा तालुक्यातील कुंभेजफाटा येथे हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन मागे घेत असल्याचा शब्द पालकमंत्री तसेच महावितरण व पोलिस प्रशासन यांना दिला आहे. आज याबाबत स्वतः माजी आमदार नारायण पाटील यांनी माहिती दिली आहे. नुकतीच जिल्हा नियोजन मंडळात विशेष सदस्य म्हणून माजी आमदार नारायण पाटील यांची निवड करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील काही आमदारां बरोबरच माजी आमदार नारायण पाटील यांना थेट सदस्यत्व दिले यामुळेच मग आजच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या या बैठकीकडे संपूर्ण करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांनी खास आपल्या शैलीत सध्या दोन तास वीजपुरवठा मिळत असल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांना किती कठीणाईचा सामना करावा लागत आहे, या वीज कपातीमुळे शेती व दुग्ध व्यावसायिक तसेच कुकुट पालन कसे धोक्यात आले आहे, शेतीतील नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांचे नुकसान कसे होत आहे आदि बाबी या बैठकीत मांडून पालकमंत्री व जिल्हाधिकारी तसेच महावितरण विभागाचे लक्ष या प्रश्नाकडे खेचुन घेतले. यामुळेच मग गांभीर्याने या प्रश्नावर चर्चा होऊन तात्काळ दोन तासावरुन आठ तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महावितरणचे आभार मानले व आपले नियोजित आंदोलन मागे घेतले. हि बातमी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना समजताच सर्वांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत आभार प्रकट केले. यापुर्वी सुध्दा ज्या ज्या वेळी शेतकऱ्याला वीज व पाणी प्रश्नावर संकटाला सामोरे जावे लागले तेंव्हा तेंव्हा माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलने केली व हे प्रश्न सोडवले. सन 2014 ते 2019 या दरम्यान आमदार म्हणून काम पहात असताना तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी थेट विधानसभा अधिवेशनात वीज प्रश्न मांडले, मंत्रालयीन पातळीवर बैठकांचे आयोजन करण्यास प्रशासनास भाग पाडले. यामुळे शेतकऱ्याला माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडूनच हा दोन तासाचा प्रश्न सुटणार याबाबत खात्री होती.   त्यानुसार आज हा प्रश्न सुटल्यानंतर शेतकरी 
वर्गास दिलासा लाभला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

14 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

18 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

24 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago