करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थकित वीज बिलामुळे सोडवू नये,हा विषय दिनांक 25 ऑक्टोबर च्या सोलापूर येथील जिल्हानियोजन बैठकीत जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी उचलून धरला होता .त्यावेळेस स्वतः पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सभागृहात ठराव करून जिल्ह्यातील सर्व आमदारांनी उर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना भेटून निवेदन देण्याचे सभागृहात सर्वानुमते ठरले होते .
आज मुंबई येथे जिल्हाचे पालकंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे, करमाळा तालुक्याचे आ.संजय मामा शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.संतोष सुळे यांनी राज्याचे उर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांना ना.दत्तामामा भरणे यांच्या लेटरपॅड वरून निवेदन दिले.
जिल्हातील इतर लोकप्रतिनिधी यांनी या वेळेस उपस्थित राहणे आवश्यक होते परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही.
ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत वीज देयके भरणा करता आली नाहीत. आता ऊस गळीत हंगाम सुरू होणार असून त्यामधून शेतकऱ्यांना विज देयके अदा करणे शक्य होणार आहे. याबाबत सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करून वीज देयके टप्प्याटप्प्याने भरण्याकरिता सवलत देण्याची विनंती केली आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करून त्यांना थकित विज देयके टप्प्याटप्प्याने भरण्याकरिता सवलत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…