अखेर करमाळा तालुक्यातील वीज पुरवठ्यावर तोडगा निघाला दिग्विजय बागल यांच्या आंदोलनाला यश

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील खंडीत केलेला वीज पुरवठा ‌सुरळीत करण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे तोडगा निघाला. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज रास्तारोको आंदोलन केले होते. यामध्ये तालुक्यातील पूर्व भागासाठी प्रती कनेक्शन अडीच रुपये, तर पश्चिम भागासाठी प्रती डीपी चाळीस हजार रुपये भरण्याचा तोडगा निघाल्यानंतरच आजपासून वीज पुरवठा चालू करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील पहिले वीज‌ पुरवठा आंदोलन यशस्वी करण्यात आल्याचे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.
आंदोलनास सुरुवात करण्यापूर्वी २६/११ या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. करमाळा येथील मुख्य चौक झालेल्या नगर-सोलापूर हायवेवरील मौलाली चौक येथे हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनास शेतकऱ्यांचा उस्फुर्त सहभाग होता. आंदोलनाच्या मुख्य मागण्या मंजूर झालेल्या नंतरच आंदोलन थांबवण्यात आले. या आंदोलनाला पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी यांनी सहकार्य केले. दिग्विजय बागल यांनी तालुक्यातील वीज पुरवठा काढलेल्या या तोडग्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी सीना-कोळगाव धरणग्रस्त संघटना, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, बागल गटाचे आजी-माजी पदाधिकारी, कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, विविध गावचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले. आजपासून वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तालुक्यातील पूर्व भाग प्रती कनेक्शन अडीच हजार रुपये, तर पश्चिम भाग प्रती डीपी चाळीस हजार रुपये भरण्यात यावे असे महावितरण अधिकारी आणि ‌शेतक-यामध्ये तोडगा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर यापुढे आम्ही लढत राहू. आजचे आंदोलन आपण शेतकऱ्यांमुळेच यशस्वी करू शकलो… दिग्विजय बागल, चेअरमन श्री मकाई सहकारी साखर कारखाना…

saptahikpawanputra

Recent Posts

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

8 hours ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

1 day ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

2 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

2 days ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

2 days ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

3 days ago