Categories: करमाळा

सरपंच परिषदेचे अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी केला शासनाचा निषेध.ग्रामपंचायतींच्या मागण्यांकरिता केले आंदोलन

 

करमाळा प्रतिनिधी  पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मिळालेल्या निधीतून कसलीही कपात करू नका. बंद पाणीपुरवठा योजनेची वीज बिले दुरुस्ती करा. सरपंच मानधन वाढवा आदी १८ मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला तालुक्यात प्रतिसाद मिळाला आहे. सरपंच परिषदेच्या वतीने बंद आंदोलनाचे आवाहन करण्यात आले आहे.पंधराव्या वित्त आयोग निधीतून कसल्याही प्रकारची कपात करू नये. हा निधी फक्त विकासकामांसाठीच वापरावा. कोरोना काळात सरपंचांनी गावपातळीवर केलेले काम अविस्मरणीय आहे. या कालावधीत राज्यातील सुमारे ३० पेक्षा अधिक सरपंचाचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी. सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ड यादीच्या घरकुल सर्वेक्षणामध्ये चुका आहेत, त्या दुरुस्त कराव्यात. संगणक चालक नियुक्तीचा अधिकार ग्रामपंचायतींना असावा, पाणी पुरवठा योजना बंद असताना वीज आकारणी झालेली दुरुस्ती करावी. प्रत्येक जिल्हा परिषदेत सरपंच कक्ष असावे. मुंबई येथे सरपंच भवन बांधावे. जिल्हा नियोजन मंडळ व विधानपरिषदेत सरपंचांना स्थान मिळावे. विधान परिषद निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकारी मिळावा. पंचायत समिती स्थरावर दरमहा तालुकास्तरीय सरपंच बैठक आयोजित करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व सरचिटणीस adv.विकास जाधव यांच्या आवाहनानुसार ग्रामपंचायत बंद आंदोलनास तालुक्यात मोठा सहभाग मिळाल्याचा दावा सरपंच परिषदेचे करमाळा तालुका अध्यक्ष डॉ. अमोल दुरंदे यांनी केला आहे.सरपंच परिषदेने पुकारलेल्या आंदोलनात राजुरी, कंदर, सावडी,जेऊर, कोर्टी,मांजरगाव, खडकी, जेऊर, भिलारवाडी, पोंधवडी, वरकटणे, गोयेगाव ता.करमाळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावून विविध मागण्यांसाठी शासनाचा निषेध नोंदविला.हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी बार्शी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या बंदला ग्रामसेवक संघटना, संगणक परिचालक संघटना यांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. एक दिवसाचा हा प्रतिकात्मक बंद आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे, असा राज्य चिटणीस ॲड. विकास जाधव यांनी इशारा दिला आहे.या बंद मध्ये सरपंच मनीषा भास्कर भांगे, सरपंच निलेश कुटे ,सरपंच गायत्री कुलकर्णी, सरपंच भाऊ शेळके, सरपंच गिरंजे, सरपंच भगवान तनपुरे, सरपंच दादासाहेब गायकवाड, सरपंच अंकुश शिंदे यांच्यासह अनेक सरपंचांनी सहभाग नोंदवला.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

11 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

16 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

21 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago