करमाळा प्रतिनिधी
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने 24 डिसेंबर पासून लावण्यात आलेल्या निर्बंधात सुट देऊन, निर्बंध थोडे शिथिल करण्यात यावे अशी मागणी भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब होसिंग यांनी केली आहे.शासनाच्या आदेशानुसार लग्न समारंभ साठी पन्नास (50) व्यक्ती तसेच अंत्यसंस्कारासाठी वीस (20) व्यक्तींचा नियम लागू केला आहे या नियमांमध्ये थोडीशी शिथिलता देऊन लग्नसमारंभासाठी दोनशे (200) व्यक्ती तसेच अंत्यसंस्कारासाठी किमान पन्नास (50) व्यक्ती या पद्धतीने परवानगी द्यावीअशी मागणी त्यांनी केली आहे.लग्न समारंभाचे बाबतीत बोलायचं झाल्यास कोरोनामुळे एक तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे यामध्ये आता कुठे थोडे बरे दिवस आले असताना शासनाने कडक निर्बंध लावल्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला असून शासनाने डेकोरेशन वाले, आचारी, घोडेवाले, बँड, कॅटर्स व इतर अशा पद्धतीने पाहिल्यास किमान 200 जणांसाठी तरी परवानगी द्यावी तर अंत्यसंस्कार विधी बाबत वीस (20) एवजी पन्नास (50) व्यक्तींना परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…