Categories: करमाळा

करमाळा शहरवासियांचा जगताप गटावरच ठाम विश्वास हे गेली २५ वर्षाच्या कामकाजावरून झाले आहे सिद्ध – नगराध्यक्ष वैभव आबा जगताप*

करमाळा प्रतिनिधी.                                     विश्वासार्हता गमावलेल्या बागलांच्या तोंडी आव्हानाची भाषा शोभत नाही, मांगीतील तुंबलेल्या गटारींकडे अगोदर लक्ष द्या, शहरवासियांचा जगताप गटावरच ठाम विश्वास हे गेली २५ वर्षाच्या कामकाजावरून झाले आहे सिद्ध झाले आहे असे मत जगताप गटाचे युवा नेते नगराध्यक्ष वैभव आबा जगताप यांनी व्यक्त केले आहे आदिनाथ व मकाई कारखान्यांच्या कारभारातून अमाप भ्रष्टाचार करून बागलांनी तालुक्यातील शेतकरी व कामगारांचे प्रपंच उद्धवस्त केले . त्याचे भोग तालुक्यातील जनता आजही भोगत आहे . बागलांनी काठावर ताब्यात आलेल्या मांगी ग्रामपंचायतीमधील गटारी तुंबून तेथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे अगोदर त्याकडे लक्ष द्यावे, बागलांच्या मांगीतील कारभाराला ग्रामस्थ कंटाळल्यामुळेच निम्मे मतदान विरोधात जावून जाता -जाता ग्रामपंचायत राहिले त्यांनी त्याची काळजी करावी .शहरातील जनता सुजाण असल्यामुळे बागलांचे कोणतेही वक्तव्य गांभीर्याने घेत नाही असे मत जगताप गटाचे युवानेते नगराध्यक्ष वैभव आबा जगताप यांनी व्यक्त केले आहे.करमाळा शहरातील जनतेचा जगताप गटाने केलेल्या विकासकामांवर ठाम विश्वास असल्यामुळेच जनतेने गेली २५ वर्षे जगताप गटाच्या ताब्यात सत्ता दिली आहे . नगरपालिकेस स्वच्छता अभियाना मधे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत . अखंड स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व अन्य सोयी सुविधा दिल्या मुळेच शहरवासियांचा जगताप गटाच्या कामकाजावर पूर्ण विश्वास आहे . कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहरात विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे . बागल यांनी दिलेले आव्हान म्हणजे गट टिकविणे साठी उसने अवसाण आणण्याचा प्रकार आहे . बागलांना २० उमेदवारांपैकी ४ उमेदवार उभे करता आले तरी पुष्कळ अशी त्यांच्या गटाची दयनीय अवस्था आहे त्यामुळे त्यांच्या तोंडी आव्हानाची भाषा म्हणजे हास्यास्पद विनोद असल्याची टीका जगताप यांनी केली आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

2 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

7 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

13 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

23 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago