संजयमामांची दिल्ली वारी तालुक्याच्या विकास कामांसाठीच, कामे आपल्याला दिसत व समजत नाहीत हा आपला वैचारीक दृष्टी दोष : तळेकर यांच्या टीकेवर बागल यांचे प्रत्युत्तर-

करमाळा प्रतिनिधी
कोरोना नियमांमुळे आमदार आपले दारी उपक्रम काही काळापुरता पुढे ढकलला आहे. परंतु कामे मात्र आ. संजयमामा शिंदे यांचेकडून अव्याहतपणे सुरू आहेत ती आपल्याला दिसत व समजत नाहीत हा आपला वैचारीक दृष्टीदोष आहे . रावगाव येथील आमदार आपले दारी हा उपक्रम यशस्वी झाला व तद्नंतर ओमायक्रान चे संकट आले मुळे शासनाने कोरोनाचे निर्बंध लादले . त्यामुळे निर्बंधांचे पालन करणेसाठी जातेगाव येथील नियोजीत कार्यक्रम स्थगीत केला गेला होता. आता कोरोनाचे निर्बंध कमी होत असून लवकरच हा उपक्रम आम्ही जनसुविधेसाठी यशस्वीपणे संपूर्ण मतदारसंघात पार पाडू . आपण टीका करीत रहा लोकशाहीत विरोधकांचे हे कामच आहे . मामा आमदार आहेत ते त्यांचे कामे कर्तव्य निष्ठेने दिल्ली – मुंबई वारी करत पार पाडत आहेत . जनता त्यांच्या कामावर खुष आहे, २ वर्षाने का होईना आपण विरोधकांच्या भूमिकेत येवून माजी आमदार आहात हे स्विकारताय हाच मामांच्या विकास कामांचा विजय आहे. असे मत संजयमामा शिंदे मोटार वाहतुक संस्थेचे चेअरमन सुजीत तात्या बागल यांनी व्यक्त केले आहे .
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की ,काम होण्याअगोदरच निवेदन देवून फोटो काढून जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपले आहेत याचे भान विरोधकांनी ठेवावे . संजयमामा शिंदे यांनी आमदार झालेपासून मतदार संघातील पाणी, आरोग्य, वीज, डिकसळ पूल, भुसंपादन मोबदला, रस्ते आदी कामांचा जो सपाटा लावला आहे यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरून राजकीय भवितव्याच्या चिंतेने ते ग्रासले आहेत त्यामुळे नैराश्येतून ते वारंवार आ .शिंदे यांचेवर टीका करत आहेत .
आ .शिंदे यांचे शासन दरबारी असलेले वजन, प्रशासनावरील वचक, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भक्कम पाठबळ व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या खंबीर साथीमुळे आ . शिंदे यांचा विकास कामांचा अश्वमेध सुसाट धावत आहे. यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत व आपली राजकीय दुकानदारी कायम स्वरूपी बंद होईल कि काय? या भीतीपोटी व आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ही प्रसिध्दीची अयशस्वी स्टंटबाजी असल्याचे मत देखील सुजीत बागल यांनी व्यक्त केले आहे .
नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या प्रवक्त्यांनी अगोदर आपण कोण आहोत? कोणाच्या बाबतीत बोलतोय? हे बोलण्या अगोदर स्वतःची पात्रता तपासावी. आमच्या ज्ञानानुसार प्रवक्ता पक्षासाठी असतो. परंतु तालुक्यातील गटासाठी सुद्धा प्रवक्ता असू शकतो याची माहिती प्रथमच त्यांनी जनतेला करून दिली हे खूप मोलाचे काम तळेकर यांनी केले आहे. इथून पुढे भविष्यात गल्लीबोळातील गटासाठीही प्रवक्ता नेमला जाईल ही लोकशाहीच्या दृष्टीने अभिमानाची बाब असेल अशी बोचरी टीकाही सुजित बागल यांनी केली.

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

5 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

11 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

21 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

1 day ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago