आदिनाथ कारखाना चालविण्यास बारामती ॲग्रोच सक्षम बचाव समितीने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये-राजेंद्र बारकुंड

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा करार बारामती अ‍ॅग्रो बरोबरच झाला असून, हा कारखाना बारामती अ‍ॅग्रो चालविण्यास सक्षम व पात्र आहे. दुसरे कोणीही हा कारखाना चालवू शकत नाही. एवढेच नाहीतर वर्गणी करून कोणताही साखर कारखाना चालू होवू शकत नाही. त्यामुळे बचाव समितीने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करू नये; असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले आहे.. पुढे बोलताना ते म्हणाले, की आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत गेल्या महिन्यापासून बचाव समितीची प्रक्रिया चालू झाली आहे. बचाव समितीला कोणतीही कायदेशीर बाजू नाही तसेच कोणतीही घटनात्मक तरतूद नाही. सभासदामधून व अन्य मार्गाने वर्गणी गोळा करून आदिनाथ साखर कारखाना चालू होवू शकत नाही. आदिनाथ कारखान्याची आर्थिक परिस्थिती व मशिनरीची दुरावस्था पाहता व तालुक्यातील राजकारण या सर्व बाबीमुळे हा कारखाना वर्गणी गोळा करून चालविणे शक्य नाही.
बचाव समिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन आदिनाथ कारखाना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता बारामती अ‍ॅग्रो हा कारखाना चालू करण्याच्या वेळेस बचाव समितीची आडकाठी ठरणार आहे. जर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न सोडवायचा असेल व आदिनाथ व्यवस्थित चालवायचा असेलतर बारामती अ‍ॅग्रो शिवाय पर्याय नाही. तालुक्यातील कोणीही व्यक्ती, संस्था अथवा राजकीय गट हा कारखाना चालवू शकत नाही. जर त्यांना चालवायचा असतातर त्यावेळेस बँकेबरोबर करार होवू दिला नसता. तसेच ज्यावेळेस बँकेने टेंडर काढले त्यावेळेसच तालुक्यातील आदिनाथची खरीच चाड असणाऱ्या व्यक्तींनी टेंडर भरले असते व कारखाना चालविण्याची भुमिका घेतली असती.
ही वेळ निघून गेल्यानंतर मात्र आदिनाथ बचावची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. २० मार्च रोजी आदिनाथची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेत सभासदांनी बारामती अ‍ॅग्रोनेच हा कारखाना चालवावा; असा ठराव घ्यावा. असे सांगून श्री.बारकुंड म्हणाले, की बचाव समितीच्या बातम्यामुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला असून त्यांनी बचाव समितीचा निषेध केला आहे. एनसीडीसी बँक व एनएमएससी बँक यांच्या काही गोष्टीमुळे एनसीडीसी बँकेत बारामती ॲग्रोकडे कर्जाविषयी कोणतीही गाईडलाइन दिली नसल्यामुळे आदिनाथ कारखाना चालू करण्यास विलंब झाला आहे. बारामती ॲग्रो लवकरच हा कारखाना चालू करण्याविषयी पुढाकार घेत असून बारामती अ‍ॅग्रोच हा कारखाना चालवूशकतो; असाही विश्वास श्री.बारकुंड यांनी व्यक्त केला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

नेरले–गौंडरे परिसराला दिलासा; करमाळा–कुर्डूवाडी एसटी सेवा पुन्हा सुरू- औदुंबरराजे भोसले

करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…

23 mins ago

निंभोरे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम : पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरणार -सरपंच रविंद्र वळेकर

करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…

47 mins ago

वाढदिवसाचा अनोखा उत्सव आकाश चिवटे यांच्याकडून १५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…

2 days ago

करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर

करमाळा, प्रतिनिधी :  करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये  १३  जुनं रोजी आधार मेळावा  आयोजित केला असुन नागरिकांनी…

3 days ago

ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी केम येथे मेळावा; तरुणांनी समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…

3 days ago