जिंती आणि कुंभारगाव फिडर वेगळे करा जनशक्ती शेतकरी संघटनेची मागणी

करमाळा प्रतिनिधी सावडी, कुंभारगाव, देलवडी आणि जिंती हि एकत्र फिडर असल्यामुळे वेळोवेळी लाईट ट्रिप होतं आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा शेतकऱ्यांना बसल्यामुळे लाईटची मागणी वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाईटची या भागात कमतरता जाणवते. इलेक्ट्रिक मोटर चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळत चालली आहेत. म्हणून जिंती व कुंभारगाव फिटर महावितरण विभागाने वेगळे करावे अशी मागणी जनशक्ती संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना अभावी अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. दुसऱ्या बाजुने कारखानदार ऊस नेत नाहीत. ऊसाची परिस्थिती गंभीर आहे. अजुन बराचसा ऊस जागेवरच आहे. आणि अशा परिस्थितीत ऊस तोडीवाले टनाला २०० रुपये मागत आहेत. अशी एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. फळबागा, भाजीपाला होरपळून जात आहेत आणि पहिल्यांदाच हा भाग तर बॅकवाटरचा नसून जिरायत भाग आहे आणि या भागात बोरवर विहीरीवर पाण्याची एकदम कमतरता असते आणि अशा कमतरतेत एका बाजुने महाराष्ट्र राज्य शासनाने लाईट तोडून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. इतक्या दिवस लाईट तोडली आणि ३ महिन्यांसाठी लाईट जोडली. तरी या ठिकाणी व्यवस्थित लाईट मिळत नाही. म्हणून त्वरीत जिंतीचा, कुंभारगावचा फेडर वेगळा केला तरच देलवडी, सावडी कुंभारगाव आणि रामवाडीचा काही भाग याठिकाणी व्यवस्थित होईल आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना कुठंतरी जीवन जगण्यापुरते पैसे शेतातुन उपलब्ध होतील. अन्यथा ड्राय भागातील शेतकऱ्यांना लाईटमुळे आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्वरीत जिंती आणि कुंभारगाव हे फिडर वेगळे करुन देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

11 mins ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

20 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

23 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago