करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील अर्जुननगर, निंभोरे व विहाळ येथील पाटबंधारे विभागाच्या साठवण तलावात गेलेल्या जमिनींचा भूसंपादन मोबदला वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. संबंधित विषयी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन व त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या 3 गावांसाठी 5 कोटी 5 लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.साठवण तलाव अर्जुननगर, विहाळ व निंभोरे या तलावामध्ये बाधित झालेल्या जमिनीचा मावेजा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. मा.आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे साठवण तलाव अर्जुननगर या तलावाच्या भूसंपादन साठी रु 79.48 लक्ष, साठवण तलाव निंभोरे या तलावाच्या भूसंपादनासाठी 1 कोटी 81 लक्ष व साठवण तलाव विहाळ या तलावाच्या भूसंपादनसाठी 2 कोटी 45 लक्ष असा एकूण 5 कोटी 5 लाख निधी मिळालेला आहे. संबंधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर या निधीचे वाटप केले जाईल अशी माहिती
अ.चं. कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी. यांनी निवेदनाद्वारे दिली.
चौकट…
आ. संजयमामा शिंदे यांचे मनापासून आभार – रवींद्र वळेकर
आमच्या निंभोरे गावातील साठवण तलाव जवळपास 20 वर्षांपूर्वी झालेला होता. सदर तलावात 22 शेतकऱ्यांची 9 हेक्टर 26 आर जमीन गेलेली होती. तेव्हापासून शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित होते. या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे केली.मामांनी तात्काळ जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे निंभोरे येथील तलावासाठी 1 कोटी 81 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .याबद्दल आमचे सर्व ग्रामस्थ आमदार शिंदे यांचे मनापासून आभारी आहेत.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…