करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराकडे प्रशासकाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नाराज झाले आहे अशी माहीती नगरसेविका राजश्री माने यांनी सांगितले आहे.रस्ता,गटारी,पाणी, समस्येने शहरवासी हैराण झाले आहे.करमाळा नगरपालिकेने कानाड गल्लीत येथे 12 ते 13 लाखापर्यंत पाणी पुरवठा योजना केली जे काम केले ते व्यवस्थित झालेली नाही ते काम केल्यानंतरही लोकांना पुरेसे पाणी पुरवठा होत नाही .कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तरी संबंधित ठेकेदाराने त्या कामाची दखल घेऊन कुठे अडचण येत आहे त्या अडीअडचणी सोडवाव्यात शहरात जेव्हापासून प्रशासन आले आहे तेव्हापासुन ते करमाळा शहरात फिरले नाही अडीअडचणी तपासून त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही सध्या पाणी, गटारी, रस्ता ह्या तिन्ही गोष्टी नागरिकांसाठी मूलभूत गरजा आहे तिन्ही गोष्टीकडे दूर्लक्ष होत आहे त्यांनी सगळ्या अडचणी सोडवल्या पाहिजे प्रशासन अधिकारी समस्या कडे डोळेझाक करीत आहे माहितीच नाही काय चाललय ते मला अस वाटतं की त्यांनी सगळ्यांनी आपली जबाबदारी समजून लक्ष घालून करमाळा शहराच्या समस्या अडचणी सोडवाव्यात नाहीतर प्रशासन विरोधात आंदोलन करणार असा ईशारा नगरसेविका राजश्री माने यांनी दिला आहे.
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…
करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…
करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…