करमाळा प्रतिनिधी देशात कुंकवासाठी प्रसिद्ध असलेले करमाळा तालुक्यातील केम गाव प्रगती होण्यापासून एक पाऊल मागे सरकत आहे. कोरोना महामारी च्या अगोदर केम मध्ये तीन मोठ्या एक्सप्रेस व पॅसेंजर थांबत होत्या.त्याकाळात विद्युतीकरणाचे काम देखील पुर्ण झाले.त्यानंतर बाकीच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले, व फक्त सोलापूर ला जाणारी व रात्री पुण्याला जाणारी पॅसेंजर चालु करण्यात आली. भाजप सरकारच्या कुरघोडीमुळे एस.टी संपावर गेली. लोकांसमोर दळणवळणाचे प्रश्न उभे झाले, लोकांचे उद्योगधंदे बंद पडले. रेल्वेसेवा बंद झाल्याने केम गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले. व्यापारी,शेतकऱ्यांना मोठया शहरात जाणे अशक्य झाले. गावाकडे व्यावसायिक दृष्टीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद झाला. हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असुन माढा लोकसभेचे खासदार, केंद्रीय रेल्वेचे सदस्य रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील प्रयत्न केले असतील तरीही केमला रेल्वेचे थांबे मिळणे मुश्किल झाले आहे. असे गंभीर आरोप केम चे सामाजिक कार्यकर्ते बागल गटाचे नेते विजयसिंह ओहोळ यांनी केला आहे. जोपर्यंत रेल्वे चालु चालु होणार नाही तोपर्यंत केम चा विकास होणार नाही असेही विजयसिंह ओहोळ यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…