करमाळा प्रतिनिधी देशात कुंकवासाठी प्रसिद्ध असलेले करमाळा तालुक्यातील केम गाव प्रगती होण्यापासून एक पाऊल मागे सरकत आहे. कोरोना महामारी च्या अगोदर केम मध्ये तीन मोठ्या एक्सप्रेस व पॅसेंजर थांबत होत्या.त्याकाळात विद्युतीकरणाचे काम देखील पुर्ण झाले.त्यानंतर बाकीच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले, व फक्त सोलापूर ला जाणारी व रात्री पुण्याला जाणारी पॅसेंजर चालु करण्यात आली. भाजप सरकारच्या कुरघोडीमुळे एस.टी संपावर गेली. लोकांसमोर दळणवळणाचे प्रश्न उभे झाले, लोकांचे उद्योगधंदे बंद पडले. रेल्वेसेवा बंद झाल्याने केम गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले. व्यापारी,शेतकऱ्यांना मोठया शहरात जाणे अशक्य झाले. गावाकडे व्यावसायिक दृष्टीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद झाला. हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा असुन माढा लोकसभेचे खासदार, केंद्रीय रेल्वेचे सदस्य रणजितसिंह निंबाळकर यांनी देखील प्रयत्न केले असतील तरीही केमला रेल्वेचे थांबे मिळणे मुश्किल झाले आहे. असे गंभीर आरोप केम चे सामाजिक कार्यकर्ते बागल गटाचे नेते विजयसिंह ओहोळ यांनी केला आहे. जोपर्यंत रेल्वे चालु चालु होणार नाही तोपर्यंत केम चा विकास होणार नाही असेही विजयसिंह ओहोळ यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…