आषाढी वारीच्या पाश्र्वभूमीवर करमाळा टेंभुर्णी रोडवरील खड्डे त्वरित बुजवुन झाडे झुडपे काढण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी केली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की करमाळा टेंभुर्णी रोड वर पडलेले खड्डे व रस्त्याच्या कडेला आलेली झाडे झुडपे यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तसेच देवळाली गावापासून 200 मीटर अंतरावर करमाळा कडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंला काटेरी झुडपे रोडवर आलेले आहेत तरी काटेरी झुडपे काढावीत व देवळालीमध्ये हायवेवर असलेले गतिरोधक वर पांढरी पट्टे देण्यात यावे जेणेकरून रोडवर होणारे अपघात टळतील सध्या रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारी मुळे लोकांची गर्दी वाढणार आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत व रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी काटेरी झाडे झुडपे काढण्यात यावे सदर बाबींची कारवाई योग्य वेळेत न झाल्यास होणाऱ्या दुर्दवी घटनेस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे सरपंच आशिष गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…