ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव असल्याने आपले ध्येय गाठतात -डाॅ.रविकिरण पवार

करमाळा प्रतिनिधी  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव असते त्यामुळे ते आपले ध्येय गाठतात ध्येयापासून विचलित होत नाहीत असे मत डॉ.रविकिरण पवार यांनी व्यक्त केले ते ज्ञानसागर समूह ,कोर्टी यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की बहुतांश पालकांची परिस्थिती बेताचीच असते आशा मध्ये मुलांना शिकवणे म्हणजे तारेवरची कसरत असते परंतु मुले ही याची जाणीव ठेवतात त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थि आज उच्च पदापर्यंत जात आहेत या गोष्टीचा आपल्याला अभिमान आहे
: दहावीला कमी मार्क पडले तरी निराश होऊ नका दहावीला कमी मार्क पडून ही कित्येक विद्यार्थी अथक परिश्रम करतात आणि एमपीएससी यूपीएससी तसेच स्पर्धा परीक्षा पास होतात
केवळ कमी मार्क पडले म्हणून निराश होऊ नका असे मत बँक ऑफ इंडियाचे अधिकारी तळेकर म्हणाले
ज्याप्रमाणे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची असते यासाठी दिशा देणारा शिक्षक हवा तुमच्या तिल चूक लक्षात घेऊन त्याला मार्गदर्शन केल्यास निश्चितच तुम्ही उत्तुंग यश मिळवू शकता असे मत कोर्टी येथील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत यवगे यांनी व्यक्त केले
गुणवंत विद्यार्थी त्रिवेणी वाघमारे, ऋतुजा अनारसे ,तनुजा अभंग यांच्यासह अनुष्का दगडे ,निकिता चव्हाण, संध्याराणी शिंदे ,तनुजा गायकवाड, सायली जाधव ,भाग्यश्री भांडवलकर, पूजा झाकणे ,राधिका पवार , यास्मिन शेख , शिवश्री जाधव या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात ज्ञानसागर समूहाचे रोहिदास शिंदे ,विनय नवले,डॉ.रवीकिरण पवार ,डॉ. हेमंत यवगे,मॅनेजर राहुल तळेकर ,डॉ. बंडगर , डॉ.मंजुषा टेकाडे,आंजना मेढे, मनोज बुराडे ,नरेंद्रसिंह ठाकूर , डी, डी ,शिंदे ,आकाश धेडे ,सनी गुणवरे, अमोल शिन्दे, अक्षय ओहोळ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

54 mins ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

6 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

13 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

22 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago